Nagpur ZP Recruitment : नागपूर जिल्हा परिषदेच्या पदभरतीसाठी परीक्षा संपेचिना; केव्‍हा होणार भरती? विद्यार्थी प्रतीक्षेतच

जिल्हा परिषदेत मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. त्यामुळे काम करणाऱ्यांवर अतिरिक्त भार येत आहे.
Nagpur ZP Recruitment
Nagpur ZP Recruitment sakal

Nagpur News : जिल्हा परिषदेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात १२ संवर्गासाठी परीक्षा झाली असून आणखी आठ संवर्गाची परीक्षा होणे बाकी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नोकरी मिळणार केव्हा, असाच सवाल परीक्षार्थी उपस्थित करीत आहे.

जिल्हा परिषदेत मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. त्यामुळे काम करणाऱ्यांवर अतिरिक्त भार येत आहे. दुसरीकडे बेरोजगारांच्या संख्येतही वाढ होत आहे. सरकारने संपूर्ण राज्यात ७५ हजार पदभरतीचा निर्णय घेतला.

रिक्त पदांच्या ८० टक्केत भरती करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत २० संवर्गामध्ये ५५७ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी २० हजार अर्ज आले असून पावणेदोन कोटी शासनाकडे जमा झाले.

Nagpur ZP Recruitment
Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशन आले अन् पंधरा दिवसांत बुजविले तीनशे खड्डे; महापालिकेची व्हीव्हीआयपींसाठी तत्परता

ही भरती प्रक्रिया खासगी संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी शुल्कही भरमसाट आकारण्यात आले. या शुल्कावर परीक्षार्थींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. परंतु सरकारने ती कमी करण्यास स्पष्ट नकार दिला.

ऑक्टोबर ७ पासून परीक्षेला सुरवात झाली. आतापर्यंत १२ संवर्गातील पदांसाठी परीक्षा झाली. तर ८ संवर्गासाठी परीक्षा होणे बाकी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप या परीक्षाचे वेळापत्रकच आलेले नाही.

सध्या हिवाळी अधिवेशनाचे सत्र सुरू आहे. त्यामुळे या काळात परीक्षा होणे अवघड असल्याचे बोलल्या जात आहे. संपूर्ण संर्वगाच्या परीक्षेसाठी आणखी दीड- दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Nagpur ZP Recruitment
Winter Session 2023 : औषध खरेदीसाठी ‘महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ कागदावरच

संपूर्ण राज्याचा विचार केल्यास या परीक्षेसाठी सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात लोकसभेसाठी आचारसंहिता लागणार आहे. त्याचा परिणाम या परीक्षांवर होण्याची शक्यता आहे.

२ हजार १८६ जणांना पैसे परत

२०१९ मध्ये जिल्हा परिषदेत ४०५ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यावेळी जवळपास २२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. परंतु नंतर परीक्षाच रद्द करण्यात आली. अर्जदारांचे पैसे परत करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

यासाठी परीक्षार्थींना ऑनलाइन अर्ज करायचा होता. २६०० परीक्षार्थींनी अर्ज केला. यातील २१८६ अर्जदारांना ६ लाख ५९ हजार रुपये परत करण्यात आले. शुल्काची रक्कम परत करण्यासाठी परीक्षार्थींनी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com