
मानकापूर : मध्यप्रदेश, छत्तीसगड व बिहारसारख्या मागासलेल्या राज्यांमध्ये उदरनिर्वाहाची फारशी साधने नसल्याने तेथील गरीब, मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी सध्या नागपुरात स्थलांतरित झाले आहेत. असेच काहीसे विदारक चित्र मानकापुरातील ठिय्यावर दिसले. येथे अनेक मजूर महिला भर उन्हात तासनतास प्रतीक्षा करून दोनवेळची भाकरीची सोय करीत आहेत.