काय करावे, कशी करावी शेती दादा; जगणे म्हणजे आमुचे निव्वळ माती दादा

काय करावे, कशी करावी शेती दादा; जगणे म्हणजे आमुचे निव्वळ माती दादा

नागपूर : खरिपाच्या हंगामाचा (kharif season) सांगावा घेऊन वळीवाचा पाऊस येत आहे. लवकरच ८ जूनला मृग नक्षत्र येऊ घातले आहे. साधारणतः मे महिन्यापासूनच शेतीकामांची उन्हाळवाही सुरू होते. नांगरणे, कचरा वेचून जमीन तयार करण्याची मशागत केली जाते. यंदा कोरोनाचे संकट घोंघावत असल्यामुळे लॉकडाउन (lockdown) आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना (Farmers) शेतीची कामे करणे अवघड झाले आहे. (The kharif season is under the control of Corona Nagpur rural news)

पारंपरिक शेती शास्त्रीय आधारावर अवलंबून असून त्यानुसार शेतकरी उन्हाळ्यात शेतीची मशागत करुन खरीप हंगामात शेती करतो. त्यावर परिवाराचे पालनपोषण होते. यावेळी लॉकडाउनमुळे शेतीच्या मशागतीच्या कामात अडचण निर्माण होत असल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्तवित आहे. हा धोका पाहता ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडून जाण्याची शक्यता कंरभाड येथील प्रगतिशील शेतकरी खेमराज दरणे तसेच प्रमोद भक्ते यांनी व्यक्त केली आहे.

पावसाच्या पाण्यावर आधारित पिके खरीप हंगामात घेतली जातात. त्यासाठी ८ जूनपूर्वी शेतीची मशागत करणे अत्यावश्यक असते. निसर्गाचा नेम नसल्याने पावसाळा सुरु होण्याआधी शेतीची मशागत टाळेबंदीमुळे झाली नाही, तर खरीप हंगामात पेरणी होणे अशक्यप्राय होते. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती निर्माण होत आहे. कापूस, सोयाबीन, बाजरा, ज्वारी, मका व इतर पिके खरीप हंगामात घेतली जातात. त्याकरिता शेतीची मशागत आधीच करणे आवश्यक असते.

काय करावे, कशी करावी शेती दादा; जगणे म्हणजे आमुचे निव्वळ माती दादा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना? 'या' वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा

८ जूनपासून खरीप हंगामाला सुरवात होणार आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था याच हंगामावर असते. यावर्षी ८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरवात होणार आहे. २१ जूनपासून आर्द्रा नक्षत्रासह पेरणीच्या कामाची वेळ असते. टाळेबंदीमुळे सर्वकाही ठप्प झाले असून शेतीकरीता लागणारी साधनेही दुकाने बंद असल्याने ती वेळेवर विकत घेता येत नाही. मे महिना हा शेती मशागतीकरीता महत्वपूर्ण असून या काळात पूर्णतः लॉकडाउनचे कुंपण घातले गेले आहे. त्यामुळे दुकाने बंद असून खरेदी करायची कशी?

कोरोना संक्रमण व मृत्यूची गती पाहता लॉकडाउन करण्यात आले, ते योग्यच आहे. पण येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी जिवन मरणाचा काळ असतो. त्या काळात जर शेतकरी शेती करु शकला नाही, तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णतः डबधाईस येईल. शेती पिकली नाही तर शेतकऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येईल. त्यासाठी शेती साहित्याची व शेतकऱ्यांना लागणारी शेतीपयोगी वस्तूंची दुकाने नियमित सुरु ठेवणे गरजेचे आहे. (The kharif season is under the control of Corona Nagpur rural news)
- नरेश भेदरे शेतकरी, पारशिवनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com