.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्या ‘लालपरी’ची प्रवासी सुरक्षा आणि विश्वसनीयता म्हणून ओळख आहे. मात्र, आता प्रवासी सुरक्षेलाच ‘तडे’ जाऊ लागले आहे. गेल्या दोन वर्षांत महामंडळात तब्बल आठ हजार ६४१ अपघात झाले असून, त्यात एक हजार ६१ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत घेतलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.