सामान्यांच्या ताटातून भाजी गायब

भाज्यांचे दर दुप्पटीने वाढले; कोथिंबीर २०० रुपये किलो
Vegetables
Vegetablessakal

नागपूर : अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने सध्या बाजारातील भाजीची आवक निम्याने कमी झालेली आहे. त्यामुळेच भाजीचे भाव दुप्पटीने वाढल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून भाजी गायब झाली आहे. कोथिंबीर ठोक बाजारात १०० ते १२० रुपये किलो असली तरी किरकोळ बाजारात १८० ते २०० रुपये किलोने विकल्या जात आहे. टोमॅटोचे भावही आकाशाला भिडले असून गेल्या आठवड्यात ३० रुपये किलो असलेले टोमॅटो आता ६० रुपयावर गेले आहे.

Vegetables
Lakhimpur : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला अटक

स्थानिक आणि बाहेरील भाजीची आवक अतिशय कमी झालेली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू झाले असून छोटे मोठे कार्यक्रमांमुळे भाज्यांच्या मागणीत दुप्पटीने वाढ झालेली आहे. त्या तुलनेत आवक कमी असल्याने भावात वाढ झालेली आहे. नवीन पीक येण्यासाठी अद्यापही २५ ते ३० दिवसाचा कालावधी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चढ्याच दराने भाजी खरेदी करावी लागणार आहे. वांग्याच्या भावात सतत चढेच आहे. कोथिंबीर, मेथी, पालकांचे भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारात सर्वच भाज्या प्रति किलो ६० ते १०० रुपये किलो झालेल्या आहेत.

ठोक बाजारातील भाजीपाला दर (रुपये प्रति किलो)

  • कोथिंबीर - १२० रुपये

  • वांगे ६० रुपये

  • गवार शेंग - ४० रुपये

  • मेथी - १०० रुपये

  • हिरवी मिरची - १५ रुपये

  • चवळी - ३० रुपये

  • फुलकोबी - ४० रुपये

  • पानकोबी ३० रुपये

  • टोमॅटो - ५० रुपये

  • भेंडी - ३० रुपये

  • शिमला मिरची - ४० रुपये

  • तोंडले - ३० रुपये

  • कारले - ४० रुपये

  • कोहळा - ३० रुपये

  • दुधी भोपळा - २० रुपये

  • पालक - ४० रुपये

  • ढेमस - ६० रुपये

  • गाजर -३० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com