

Nagpur News
esakal
अंबाडा: यंदा मार्च महिन्याच्या अखेरीसच तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नरखेड तालुक्यातील संत्री व मोसंबी बागांना मोठा फटका बसत आहे. हजारो रुपयांचा खर्च करून फुलवलेल्या आंबिया बहरातील फळे झाडांवरून मोठ्या प्रमाणात गळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. डोळ्यांदेखत फळे जमिनीवर पडत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.