

Buldhana
esakal
नांदुरा: तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून रानटी डुक्कर, हरीण, रोहिट आदी वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सद्या पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने पेरणीची धामधूम सगळीकडे सुरु असून ज्यांचेकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या व जुनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात कपाशी पीक पेरले आहे. अशा सर्वच पिकांचे हे वन्यप्राणी अतोनात नुकसान करत आहे. त्यामुळे वन्यप्राण्याच्या भीतीत रात्र रात्र शेतात शेतकऱ्यांना जागरण करावी लागत आहे.