Vidhan Sabha 2019 : तरुण पिढीला हवाय बदल : शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

यवतमाळ : गुजरातचे आदेश पाळायचे, त्यांच्या साईचे निर्णय घ्यायचे असा सपाटा राज्यशासनाने लावला आहे. यांचा परिणाम राज्यातील रोजगारावर झाला आहे. बेरोजगारी, महागाई, शेतीचे प्रश्‍न वाढत असल्याने तरुण वर्गात मोठा असंतोष दिसत असून तरुण पिढीला बदल हवाय असेच चित्र सध्या राज्यात दिसत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

गुजरात गुंतवणूक करण्यात कसे सोईचे आहे असे चित्र केंद्राकडून भासवले जात आहे. अहमदाबाद-मुबंई या बुलेट ट्रेनची मागणी कुणीही केली नसताना हा प्रकल्प हाती घेण्यात आला. यापेक्षा दिल्ली-मुबंई-नागपूर असा प्रकल्प हाती घेतला असता तर विदर्भ,मराठवाडा अशा राज्यातील सर्वच भागाला त्यांचा लाभ मिळाला असता. रोजगार निर्मीती झाली असती. मात्र, सत्ताधार्‍यांना तसे करायचे आहे असे दिसत नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काळात सुरू झालेले कारखाने या सरकारच्या काळात बंद पडले आहेत. जे सुरू आहे त्यातील कामगार काढले जात आहे. राज्य आणि देशाला संकटात नेणार्‍यांना सत्ताधार्‍यांना खाली खेचू असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. यात आम्हाला युवकांची मोठी साथ मिळत असून युवकांचे प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरलेल्यांना तरुण पिढी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com