Vidhan Sabha 2019 :मतदान केंद्र असलेल्या शाळांमध्ये नाही वीज

File photo
File photo

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या जवळपास दोनशेवर शाळांमध्ये थकीत बिलापोटी वीज जोडणी बऱ्याच दिवसांपासून खंडित केली आहे. यापैकी बहुतांश शाळांमध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान केंद्र आहेत. वीज नसल्यामुळे या केंद्रावर प्रकाश व्यवस्था कशी केली जाईल, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील 12 पैकी सहा विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागात आहे. बहुतांश मतदान केंद्र जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये असणार आहे. विजेअभावी मतदानाच्या दिवशी केंद्रावर उपस्थित होणाऱ्या मतदारांची अव्यवस्था होणार आहे. मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजतापर्यंत आहे. मतदानानंतर मतदान यंत्र मोहरबंद करणे व इतर सांख्यिकीय कामासाठी मतदान अधिकाऱ्यांना दोन ते तीन तासांचा वेळ मतदान केंद्रावर घालवावा लागतो. मात्र, कर्मचारी व निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने ही बाब असुरक्षित व धोकादायक ठरणार आहे. याचबरोबर मतदान पथकामध्ये असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍नसुद्धा निर्माण होणार आहे.
मतदान केंद्रावर नियमबाह्य पद्धतीने किंवा तात्पुरत्या स्वरूपाची वीज व्यवस्था निवडणूक विभाग करेल की या शाळांची वीज जोडणी नियमित करून मतदान केंद्र अंधारमुक्त करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com