बाजारपेठांच्या वेळेत बदल होणार नाही; अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

market
market

अमरावती : विविध व्यापारी संघटनांनी दुकानाची वेळ वाढविण्याची मागणी केली असली तरी तूर्तास तरी जैसे थेच परिस्थिती राहणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले आहे.

वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाकडून दोन आठवड्यांचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाकडून लॉकडाउन उठविण्यात आला आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचा इशारा देत दुकानांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत निर्धारित करण्यात आली. त्याचे चांगले परिणामसुद्धा दिसायले लागलेत. 

मात्र अमरावतीच्या बाजारपेठेत ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या मोठी आहे. गावातून शहरात येईपर्यंत ही वेळ होऊन जाते आणि व्यापाऱ्यांसह दुकानदारांना नुकसान होते, असा मुद्दा व्यापारी संघटनांनी उपस्थित करीत सकाळी 11 ते रात्री सात किंवा आठपर्यंत बाजारपेठेला परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र तूर्तास तरी वेळ न बदलविण्याच्या मानसिकतेमध्ये जिल्हा प्रशासन दिसून येत आहे.

मागील दोन-तीन दिवसांत रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी कोरोनाचे संकट दूर झाले असे होत नाही. शहरातील बाजारपेठ, दुकाने, व्यवसायांना शिस्तबद्ध पद्धतीने टप्प्याटप्याने वेळ वाढवून दिला जाईल. मात्र तूर्तास तरी ती वेळ अजून आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून निर्धारित केलेल्या वेळेवरच दुकाने सुरू आणि बंद होतील.
-शैलेश नवाल, 
जिल्हाधिकारी 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com