कारंजा (घा.) (जि. वर्धा) : ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते... मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’... असे सुरेश भटांची कविता सांगत असली तरी कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा गावाला ही कविता लागू होत नाही..येथे मरणानंतरही छळ कायम असल्याचे दिसून आले. येथे मरणानंतर सरणावर जाण्याकरिता मृताला खडतर वाटेतूनच प्रवास करावा लागतो. सुसुंद्रा (हेटी) हे अदमासे २५० ते ३०० लोकसंख्येचे आदिवासी पाडे. त्या गावात जाण्याकरिता एकमेव रस्ता आहे. सुसुंद्रा या गावाची स्मशानभूमीही याच हेटी मार्गावर आहे..पावसाळ्यात अंत्यविधी करताना सर्वांना जीव मुठीत घेऊन सोपस्कार पार पाडावे लागतात. पावसाच्या दिवसात कुणाचे निधन झाले तर अक्षरशः पाण्यातून वाट काढत अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमी पर्यंत जावे लागते. .या दिवसात कोणाचे निधन होऊ नये असे येथील लोकांना मनोमन वाटते. मरणोपरांतही इथला संघर्ष संपत नाही. अनेकदा निवेदने देऊन झाले. पण कुंभकरणी झोपेत असलेल्या कुठल्याही राज्यकर्त्यांना हा गावालगतचा पूल व्हावा अशी सद्बुद्धी सुचली नाही, हीच खरी शोकांतिका आहे..Yavatmal News : पुण्यातील खून प्रकरणातील आरोपीला यवतमाळात अटक.स्वातंत्र्याच्या ७६ वर्षाच्या नंतर ही या यातना गावकऱ्यांना भोगाव्या लागत आहे. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरित असला तरी पुढे राहणार नाही याची काळजी घेणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी नाही का? असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.