
अमरावती : सर्वांत जास्त अधिकार असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच तसेच सदस्य होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. बुधवारपासून (ता.23) नामांकनाचा धुराळा उडणार असून त्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापणार आहे. सध्या जोडतोडीला चांगलाच वेग आला आहे.
नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असून अनेकांनी नामांकनाची तयारी केली आहे. 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. नवीन वर्षांत म्हणजे 15 जानेवारीला मतदान असून 18 ला निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. तूर्त तरी नामांकन दाखल करण्यावरून राजकारणात रंगत आली आहे.
हेही वाचा - जागते रहो...गडचिरोली शहराच्या वेशीवरच आले वाघ!
पॅनलमध्ये चढाओढ -
ग्रामपंचायतींमध्ये आपलीच सत्ता यावी, यासाठी यंदा राजकीय पक्षांनी ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. समर्थकांचे पॅनेल तयार करून त्यामध्ये सक्षम व वजनदार उमेदवार देण्याची चढाओढ सध्या लागली आहे.
हेही वाचा -
अनेकांच्या आशा पल्लवित -
केंद्र तसेच राज्य शासनाकडून देण्यात येणारा विकासकामांचा निधी थेट ग्रामपंचायतला येत असल्याने यंदा ग्रामपंचायतींमध्ये प्रवेश करण्यास अनेक इच्छुक तयार झाले आहेत. 14 तसेच 15 वित्त आयोगाचासुद्धा लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतींच्या तिजोरीत येत असल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.