पाण्यासाठी वाट्टेल ते! सोशल डिस्टंन्सिंग गेले उडत

panitanchai
panitanchai
Updated on

चंद्रपूर : पाणी हे जीवन आहे हेच खरे. कारण पाणी मिळावे म्हणून  कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी 'सोशल डिस्टन्सिंग'वर  प्रशासन भर देत आहे. मात्र त्याउपरही गरजेपोटी नागरिक अनेक ठिकाणी याला हरताळ फासत आहेत. चंद्रपूर मनपा क्षेत्रात आठवडाभरापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाण्यासाठी सार्वजनिक नळावर तुडूंब गर्दी उसळत आहे. पाणी मिळविण्यासाठी चढाओढ करताना कोरोना वादळाचाही महिलांना विसर पडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
             लॉकडाऊन आहे. सर्वत्र नाकेबंदी केली आहे. विनाकारण फिरणा-यांवर पोलिस कारवाई करीत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात 'सोशल डिस्टन्सिंग' पाळले जाते की नाही, याकडे प्रशासन जातीने लक्ष देत आहे. किराणा, औषधांची दुकान, भाजीबाजारात लोकांनी अंतर पाळावे, यासाठी चुना आखून वर्तुळ तयार केले आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींनी सहा फुटाचे अंतर राखावे, असे शासनाचे निर्देश आहे. मात्र, शहरातील सार्वजनिक नळ याला अपवाद ठरले आहेत.
             चंद्रपूर शहरात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अर्धे शहर कोळसा खाणीवर वसलेले आहे. भूमिगत कोळसा खाणीमुळे शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत उन्हाळ्यात कोरडे पडतात. बहुतेक भागातील विहिरी, बोअरवेलमध्ये सध्या ठणठणाट आहे. तब्बल ३५ हजार नळजोडण्या शहरात आहेत. सार्वजनिक नळांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. याच सार्वजनिक नळांवर पाण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी महिलांचे पाण्यासाठी युद्ध रंगते. पाणी मिळविण्यासाठी या नळांवर मोठी गर्दी उसळते.
सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या धोक्याचाही विसर महिलांना पडतो. त्यांना फक्त पाणी हवे असते. येथील जोडदेऊळ परिसरातील सार्वजनिक नळावर अशीच गर्दी मंगळवारी सकाळी बघायला मिळाली. कोरोना माहित आहे. परंतु घरात पाणीच नाही. नळ थोड्याच वेळात जाईल. त्यामुळे पाण्यासाठी धक्काबुक्की करावीच लागते, असे महिलांचे म्हणणे आहे. इकडे कोरोनाचे संकट असतानाही नाईलाजाने महिला पाण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही.   

सविस्तर वाचा - अशी वेळ कोणावरही येऊ नये...कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करणा-या कर्मचा-याच्या भावना                                                                                  दुसरीकडे एक दिवसाआड पाणीपुरठ्याचे खापर मनपाने कोरोनावर फोडले आहे. शहरातील जलवाहिन्या १९८८ मध्ये टाकण्यात आल्या. आता लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे या जलवाहिन्यांतून नियमित पाणी पुरवठा करणे शक्य नाही. त्यासाठी अमृत योजनेतंर्गत नवी जलवाहिनी टाकली आहे. मात्र कोरोनामुळे ते काम थांबले आहे. परिणामी एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील एका अधिका-याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com