यवतमाळ जिल्ह्यातील केवळ तीन प्रकल्प भरले

File photo
File photo

यवतमाळ : जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 911.34 मिलिमीटर आहे. पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 56 टक्के पर्जन्यमान झालेले असून, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ तीन प्रकल्प भरलेले आहेत. उर्वरित सर्व प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे भविष्यात सिंचन व पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडण्याची शक्‍यता आहे.
जिल्ह्यात चार मोठे, सहा मध्यम व अनेक लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील जलसाठ्यावरून जिल्हाभरात सिंचन व पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. मात्र, यंदा केवळ 56 टक्केच पर्जन्यमान झाल्याने प्रकल्प अपूर्ण आहेत. बेंबळा, सायखेडा, नवरगाव हे केवळ तीन प्रकल्प भरलेले आहेत. उर्वरीत प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यामध्ये पूस प्रकल्पात 45 टक्के जलसाठा आहे. अरुणावती 13 टक्के, गोकी 53, वाघाडी 80, बोरगाव 97, अधरपूस 98, अडाण प्रकल्पात 14 टक्के जलसाठा आहे.
यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बीला सुरुवात होते. जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्‍टरवर रब्बी हंगामाची पेरणी होते. त्यासाठी जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे. मात्र, यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला नाही. त्यातच प्रकल्प अपूर्ण असल्याने व सिंचनासाठी अडचण येणार आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com