

Amravati News
esakal
पथ्रोट : मागील चार महिन्यांपासून महामार्गावरील पथदिव्यांच्या खालचा अंधार कायम असून त्यानंतर सुरू करण्यात आलेले दुरुस्तीचे काम महिन्याभरापासून अत्यंत संथगतीने सुरूच आहे. त्यामुळे असुविधा व अपघाताचे प्रमाण वाढल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग उपविभाग अमरावती यांनी पथ्रोट गावातून जाणाऱ्या अंजनगाव ते मध्य प्रदेश बॉर्डर महामार्गावर पथ्रोट गावाच्या लांबितले चार पदरी काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केले होते. त्यावर २४ मे २०२१ ला २९ पथदिव्यांची उभारणी करून ते ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्यात आले होते.