

Buldhana News
esakal
संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा ते आठवडी बाजारपर्यंत पाचशे मीटर रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले. मात्र अवघ्या आठ दिवसातच हा रस्ता उखडला असून ऐशीतैशी झाली आहे.
खांडवी ते कोड्री पर्यंत राज्यमार्ग २७८ या दर्यापूर अमरावती जोडणाऱ्या रस्त्याचे काम मागील सात वर्षांपासून कृष्णाई कंपनीकडून केले जात आहे. दरम्यान ठिकठिकाणी टप्प्याटप्प्यात कंपनीने काम केले. मागील एक ते दीड वर्षांपासून पातुर्डा येथील जिल्हा परिषद शाळा ते आठवडी बाजार या पाचशे मीटर रस्त्याचे काम बंद पडले होते.