

Vardha News
esakal
वर्धा: पिपरी गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी तुळजाभवानी माता मंदिर परिसरात पुन्हा एकदा फुटल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या प्रकारामुळे प्राधिकरणाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गत आठवड्यातच संबंधित जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच पुन्हा फुटल्याने दुरुस्तीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.