

कारंजा : राज्यात गोधन हत्या विरोधी कायदा असताना गोधनाची सर्रास कत्तल केली जात आहे. समृद्धी महामार्गावर तपासणी करताना पोलिसांना वाहनात गोधन दिसले. सर्वात गंभीर बाब म्हणजे ३१ बैलांपैकी चार बैल मृत झाले होते तर २७ जिवंत होते. ही घटना कारंजा येथे समृद्धी महामार्गावर उघडकीस आली आहे.