गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न

file photo
file photo

गडचिरोली : जिल्ह्यात यंदा पावसाने अनेक भागांत हाहाकार माजवला आहे. महिना उलटूनही पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुराचा सर्वाधिक फटका भामरागडसह गुंडूरवाही व पोयरकोटी येथील ग्रामस्थांना बसला असून घरातील जीवनावश्‍यक वस्तू पुरात वाहून गेल्याने पूरपीडितांपुढे उदरनिवार्हाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे.
पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्‍यात हाहाकार माजला आहे. पुरात जनावरे, अन्न-धान्य, कपडे, भांडे वाहून गेले तर तीनशेच्या जवळपास घरांचे पूर्णत: नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 7 सप्टेंबरला अचानक महापूर आल्यामुळे लोकांना अक्षरशः घर सोडून सुरक्षित ठिकाणी पळून जावे लागले. कित्येक लोकांनी रात्र उघड्यावरच काढली. पिण्याचे पाणी, अन्न तसेच आरोग्याची समस्या पूरग्रस्तांना भेडसावत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच मदतीसाठी उपाययोजना केल्या आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com