

Chandrapur
esakal
राजुरा: गेल्या पाच दिवसांहून अधिक काळ पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळलेल्या शहरातील महिलांचा संताप अखेर गुरुवारी (ता. १८) नगर परिषद भवनात उसळला. डोक्यावर हंडे, हातात निवेदने आणि ओठांवर तीव्र घोषणा घेऊन भाजपा महिला मोर्चाच्या नेतृत्वात पालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.