अकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो मोफत तांदुळ वितरण करण्यात येणार आहे. रास्तभाव दुकानांमधून सदर तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे. त्यापैकी काही कार्डधारकांला मिळणारे तांदुळ 60-70 किलोपर्यंत असल्याने लाभार्थी तांदुळाची उचल करुन ते खुल्या बाजारात विकत आहेत. त्याबदल्यात लाभार्थी पैसे अथवा इतर वस्तुंची खरेदी करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदुळाचे वाटप सुरू झाले आहे. या योजनेत प्राधान्य गटातील लाभार्थी व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति महिना 5 किलो तांदुळ मोफत देण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत.
संबंधित लाभार्थ्यांना कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर रास्तभाव दुकानातून सदर तांदुळाचे वितरण करण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत तांदुळाचे वाटप ई-पॉस मशिनद्वारे व मोफत होत आहे. मात्र लाभार्थ्यांना मोफतमध्ये मिळणारे तांदुळ 60 ते 70 किलोपर्यंत असल्याने लाभार्थी मोफतचा तांदुळ खुल्या बाजारत विकून त्याबदल्यात इतर वस्तुंची खरेदी करत आहेत.
असे होत आहे वाटप
रेशन दुकानातून तांदुळाची उचल
गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे. कार्डधारक रेशन दुकानातून तांदुळाची उचल सुद्ध करत आहेत. परंतु त्यानंतर लाभार्थ्यांनी मोफतचा तांदुळ बाजारात विकल्यास पुरवठा विभाग लाभार्थ्यांवर कार्यवाही करु शकत नाही. जिल्ह्यात असे प्रकार निदर्शनास येत आहेत.
- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.