

Washim News
esakal
रिसोड: मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाडव्याच्या दिवशी शेतकरी तास काढतात. परंतु, अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अक्षय तृतीयापासून प्रत्यक्ष खरिपाच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. मृग नक्षत्र ४० दिवसांवर येऊन ठेपले आहे. ग्रामीण भागात आजही शेतकरी पारंपारिक पद्धतीने बैलाच्या सहाय्याने मशागतीची कामे करतात. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असली, तरी सकाळ संध्याकाळ शेतीची कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.