

Vardha Tiger News
esakal
गिरड: ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशी सलग्न हजारो हेक्टर मधील जंगलरानात शेकडो वन्यजीवांच्या कळपाच्या वास्तव्याने जनजीवन नाकीनाऊ झाले आहे. पिकांची नासाडी, पाळीव प्राण्यावर हल्ले, हिंसक प्राण्याचे मानवावर हल्ले आणि कायमची दहशत. या भागात सात ते आठ वाघांचे वास्तव्य असून पाळीव जनावरांवर हल्ले सुरूच आहे. वाघांच्या हल्ल्यात तब्बल १९८ पाळीव जनावर ठार झाली आहे.