साडेसातशेंनाच सौर ऊर्जा; दोन वर्षांपासून शेतकरी "वेटिंग' 

file photo
file photo

यवतमाळ : कृषिपंपांसाठी वर्षांनुवर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने सौर कृषिपंप जोडणीची योजनेची घोषणा केली. सुरुवातीला अटल सौरपंप कृषी योजनेतून शेतकऱ्यांना जोडणी देण्यात आली. त्यानंतर साधारणतः दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू केली. वीजजोडणीसाठी वेटींगवर असलेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश करण्यात आला. मात्र, दोन वर्षांत केवळ 777 शेतकऱ्यांना वीजजोडणी दिली असून, अजूनही दीड हजार शेतकरी प्रतीक्षेतच आहेत. 

हे वाचा—काय ही श्रीमंती? नायब तहसीलदार साहेबांनी कापले हॅपी बर्थडेला नऊ केक... 

शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी 
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी,यासाठी कृषिपंप जोडणी देण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांत वीजवाहिनीवरील कृषीपंपाच्या जोडणी देण्यात अनेक अडचणी आल्या. परिणामी, शेतकऱ्यांची यादी वाढतच गेली. या मुद्दावरुन त्यावेळी विरोधकांनी राज्यभर मोठे रान उठविले होते. त्यानंतर सौंरकृषी पंपांचा पर्याय समोर आला. शेतकऱ्यांना तत्काळ वीजपुरवठा देण्यासाठी अनेक वर्षांपासून "पेड पेन्डींग'असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश सौरकृषीपंप योजनेत करण्यात आला. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना अटल सौरपंप योजनेतून जोडणी देण्यात आली. यानंतर या योजनेचे रूपांतर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत करण्यात आले. मुख्यमंत्री सौर कृषीपंपयोजने जिल्ह्यातील एक हजार 946 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. वीज जोडणीसाठी प्रस्ताव दाखल केलेल्या सर्व शेतकऱ्यांना महावितरणने कोटेशन दिले. एक हजार 506 शेतकऱ्यांच्या अर्जाचे सर्वेक्षण केले. यातील 517 शेतकऱ्यांचे वर्कऑर्डर देण्यात आले. हे वाचा— कोरोना मास्कवरती पैठणीचा मोर नाचरा हवा...आता मास्कच्याही नाना तऱ्हा 
 

142 सौरपंपाचे काम प्रगतिपथावर 
यातील 777 शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली. 143 सौरपपांचे काम प्रगतिपथावर आहे. शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी महावितरकडून मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली. योजनांचा गाजावाजाही मोठ्या प्रमाणात करण्यात आला. मात्र, यानंतरही अनेक शेतकरी अजूनही विजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पावसाळा असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची गरज नाही. मात्र, पावसाळ्यानंतर पिकांना वाचविण्यासाठी कृषीपंपांची गरज आहे. कृषीपंपावर भारनियमन सुरू असल्याने सौरपंपांचा पर्याय शेतकऱ्यांना पटला. परंतु, या योजनेतही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून अजूनही दीड हजारावर शेतकरी वेटींगवरच आहे. परिणामी, योजनांचा सुकाळ असला तरी शेतकरी मात्र, नागवलाच जात आहे. 

(24जून2020 ची स्थिती) 

  • प्राप्त अर्ज-1946 
  • तीन एच पी-1658 
  • पाच एचपी-288 
  • वर्कऑर्डर-517 
  • सर्वे-1506 
  • प्रगतीत-143 
  • जोडणी-777 


जोडणी देण्यासाठी महावितरणकडून गतीने कामे करून घेतली जात आहे. संबंधितांना तशा सूचना वारंवार दिल्या जात आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचा प्रयत्न आहे. 
-सुरेश मडावी, अधीक्षक अभियंता, महावितरण.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com