वैधानिक विकास मंडळे धोक्यात!

vidharbha development board
vidharbha development board

अकोला :  महाराष्ट्रातील विकासाचा प्रादेशिक असमोतल दूर करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली वैधानिक विकास मंडळेच धोक्यात आली आहे. येत्या 30 एप्रिल रोजी मंडळाची वैधानिक मुदत संपत असून, मंत्रिमंडळाने मुदतवाढीचा प्रस्ताव न दिल्याने ही मंडळे इतिहास जमा होण्याची शक्यता आहे.


राज्यघटनेच्या कलम 371 (2) अन्वये राष्ट्रपतींनी 9 मार्च 1994 रोजी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या क्षेत्रांसाठी प्रादेशिक विकास मंडळे स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी 30 एप्रिल 1994 रोजी तीन वैधानिक मंडळाची स्थापना केली. या मंडळाचा कार्यकाळ 30 एप्रिला 1999 ला संपणार होता. परंतु मंडळाने हाती घेतले अनेक महत्त्वपूर्ण कामे अपूर्ण राहिल्यामुळे तसेच विकासाचा प्रादेशिक असमतोल पूर्णपणे दूर न झाल्याने राष्ट्रपतींनी मंडळाला 30 एप्रिला 2010 पर्यंत मुदत वाढ दिली. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे 30 एप्रिल 2015 रोजी परत पाच वर्षे मुदत वाढ दिली. ही मुदत 30 एप्रिल 2020 रोजी संपत आहे.

नागपूरच्या पालकमंत्र्यांनी केले होते अलर्ट
वैधानिक विकास मंडळाची मुदत 30 एप्रिल रोजी संपुष्टात येत असल्याने नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मुदतवाढीची शिफारस राज्यपाल यांना करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार 27 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी काही निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र मंत्रिमंडळात हा प्रस्तावच ठेवण्यात आला नाही.


राजकीय दृष्ट्या पांढरा हत्ती
राज्यातील वैधानिक विकास मंडळांना 5 सप्टेंबर 2011 पूर्वी सामूहिक विकास योजनेअंतर्गत एकत्रित शंभर कोटी इतका विशेष निधी वाटप करण्याचे अधिकार होते. पुढे अधिकार गोठविण्यात आले. त्यामुळे विकास मंडळाचे अध्यक्षपद आता राजकीय दृष्ट्या पांढरा हत्ती ठरतो आहे. प्रादेशिक विकासाच्या असमोतोल दूर होण्यापूर्वीच विकास मंडळांची उपयोगिता संपल्याचे चित्र रेखाटले जात आहे.

महाराष्ट्रातील विभागांचा विविध क्षेत्रांमधील झालेला असमतोल विकास हे मांडण्याचे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून विकास मंडळाचे महत्त्व आहे. 30 एप्रिल नंतर विकास मंडळांना मुदतवाढ न मिळाल्यास, हे व्यासपीठ, विशेष करून विदर्भ-मराठवाडा या अविकसित भागांना गमवावे लागेल. राज्यपालांनी मार्च 2020 मध्ये शासनाला एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्याव्दारे 1994 नंतर महाराष्ट्रातील विभागांमधील विविध क्षेत्रांमधे निर्माण झालेल्या अनुशेषाचा अभ्यास करण्याचा आदेश दिला होता. हा आदेशही पाळला जाणार नाही.
- संजय खडक्कार,
माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com