अकोला : खरीप आठवडाभरावर येऊन ठेपला असून, शेतकरी पेरणीच्या तयारीला सज्ज होत आहेत. परंतु, जोमदार खरीप हवा असेल तर, शेतकऱ्याला आताच दमदार नियोजन करणे गरजेचे असून, स्वतःच्या आरोग्य सुरक्षेचे उपाययोजन करणेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, कीडींचा हल्ला, फोफावलेले तण, शेतमालाचे कमी भाव इत्यादी कारणाने शेतकरी सातत्याने नुकसान सोसत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी कमी खर्चात अधिक व गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादन घेण्याचा आणि त्यावर प्रक्रिया करून बाजारपेठेत तो विक्री करण्याचा सल्ला कृषी अभ्यासकांनी दिला आहे. परंतु, हे सर्व करण्यासाठी आणि जोमदार हंगाम ठरण्यासाठी पेरणीपासूनच योग्य व दमदार नियोजन करण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
असे करा खरीप पेरणीचे नियोजन
कृषी निविष्ठांची जुळवाजुळव करतांना घ्या काळजी
कृषी निविष्ठांची जुळवाजुळव करण्यासाठी/ खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर जात असताना शक्यतो अगोदरच दुकानदाराशी फोनद्वारे संपर्क साधून मागणी नोंदवा. कृषी केंद्रावर गर्दी असल्यास सोयीची वेळ साधून कृषी निविष्ठा खरेदीसाठी जा. कितीही जवळचा व्यक्ती किंवा नातेवाईक, कोणासोबतही हस्तांदोलन, गळाभेट टाळा. खरेदी करून घरी परतल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवा कपडे धुऊन ठेवा.
कोरोना पासून बचाव करण्यासाठी...
कोरोनापासून बचाव करण्यासाठी शेतकरी, शेत मजुरांनी शेतात काम करत असताना एकमेकांपासून किमान पाच फूट अंतर ठेवावे. नका तोंडाला मास्कचा वापर करावा. शेतमाल कापणी, तोडणी करताना चार ते पाच फुटांचा पट्टा वाटून घ्यावा. गर्दी टाळावी, वेळोवेळी साबणाने हात धुवावे, सॅनिटाईझरचा वापर करावा. कुठलाही आजार झाल्यास त्वरित शासकीय डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.