

Amravati News
esakal
सुलतानपुर: एकेकाळी उन्हाळा सुरू झाला की गावोगावी, चौकाचौकात, बसस्थानक परिसरात तसेच मुख्य रस्त्यांवर समाजसेवी संस्था, व्यापारी, दानशूर व्यक्ती आणि युवक मंडळांच्या वतीने “पाणपोई” उभारल्या जात असत. प्रवाशांना थंड पिण्याचे पाणी मिळावे, तहानलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत अनेकजण पुढाकार घेत असत. मात्र बदलत्या काळात ही परंपरा हळूहळू लोप पावत असून यंदाच्या तीव्र उन्हाळ्यातही पाणपोईंचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.