तोतलाडोह धरण हाउसफुल्ल!

तोतलाडोह धरण हाउसफुल्ल!
टेकाडी/नागपूर, ता. 9 : पेंच नदीच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नागपूरकरांना पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह धरण हाऊसफुल झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी भरेल की नाही अशी चिंता सतावत असताना सोमवारपर्यंत धरणात 85 टक्के साठा झाला होता.
पेंच नदीवर बांधण्यात आलेल्या मध्य प्रदेशातील चौराई धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे तोतलाडोह 85 टक्के भरले असून आता येथूनही विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पेंच व कन्हान नदीकाठावरील गावांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी केले आहे. तोतलाडोह धरणात सरासरीपेक्षा जास्त जलसाठा निर्माण झाल्याने नागपूर शहरावर असलेले जलसंकटाचे सावट टळले आहे. मध्यप्रदेश सरकारने पेंच नदीवर बांधलेल्या धरणामुळे तोतलाडोह जलाशयात मागील वर्षी सरासरीच्या निम्मे जलसाठा होता. यावर्षी मृतसाठ्यातून नागपूर शहराला पाणी देण्यात आले होते. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस कोरडे गेल्यामुळे आगामी वर्षात जलसंकट गडद होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र मागील महिनाभरापासून सातपुड्याच्या महादेव टेकड्यांमध्ये अतिवृष्टी व संततधार पावसामुळे मध्य प्रदेशातील चौराई धरण पूर्णत: भरले व पाण्याचा विसर्ग सुरू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com