अल्लीपूर : नातलगाकडिल काम आटोपून परत येत असलेल्या युवकांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. यात अल्लिपूर येथील दोन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. .ही घटना सोमवारी (ता. १६) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास देवळी तालुक्यातील रत्नापूर फाट्याजवळ घडली. प्रफुल्ल किटे (वय ३८) व समीर संधु रेढे (वय २३) अशी मृतांची नावे आहेत..प्रफुल्ल आणि समीर हे काही कामानिमित्त शिरपूर येथे नातेवाइकाकडे गेले होते. तेथील कामे आटोपून दोघेही दुचाकीने अल्लिपूरकडे येत होते. दरम्यान रत्नापूर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली..₹145 Cr Farmer Scam : रामनराव बोल्लाचा ₹१४५ कोटींच्या शेतकरी फसवणुकीत जामीन फेटाळला.यात दुचाकी चालक प्रफुल्ल किटे आणि मागे बसून असलेल्या समीर रेढे या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक देऊन ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला..घटनेची माहिती गावात मिळताच गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्रफुल्ल किटे याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी आहे. तर समीर हा होतकरू मुलगा म्हणून त्याची गावात ओळख होती. त्याचे शिक्षण सुरू होते. देवळी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.