तिवसा (जि. अमरावती) : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीमुळे मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. अतिरिक्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी झाली. यामुळे हताश झालेले शेतकरी देवराव शामराव सांभारे (वय ५६, रा. ममदापूर) यांनी आत्महत्येचा पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली. शेतातून घरी येताच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तिवसा तालुक्यातील ममदापूर गावात घडली.
प्राप्त माहितीनुसार, सांभारे यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांनी कर्ज काढून दोन एकरांमध्ये सोयाबीन तर दोन एकरात पऱ्हाटी पेरली होती. मात्र, सततच्या पावसामुळे सोयाबीनही गेले व जास्त पाऊस झाल्याने पऱ्हाटीवर बोंडआळीचा प्रादुर्भाव असल्याने तेही पीक हातून गेले. सकाळी ममदापूर शेतशिवारात असलेल्या शेतात गेले असता कपाशी पिकावर आलेली बोंडअळी व पूर्वीच सोयाबीन पिकांचे झालेले नुकसान त्यातच शेतीसाठी कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यावर त्याचा मनावर विपरित परिणाम झाला.
शेतातून घरी येताच त्यांनी गळफास घेतला. ही बाब कुटुंबातील लोकांचे लक्षात येताच त्यांनी गळफास सोडला व तातडीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तिवसा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
अंजनगावसुर्जीच्या जोड हनुमाननगर येथील युवा शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. अंकित निळकंठ ढोरे (वय २२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. अंकितने विष घेतल्यानंतर उपचारासाठी अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अंकितच्या शुक्रवारी (ता. सहा) मृत्यू झाला. फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.
संपादन - नीलेश डाखोरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.