

Washim News
esakal
कारंजा: तालुक्यातील उंद्री धरण परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घालत शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्यासारखी घटना घडवली आहे. ता. १० एप्रिलच्या मध्यरात्री चोरट्यांनी योजनाबद्ध पद्धतीने दहा शेतकऱ्यांच्या मोटार पंपांना जोडलेले वीज केबल चोरून नेले. ही धक्कादायक बाब ता. ११ एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरातील सिंचन व्यवस्था ठप्प झाली असून, शेतकऱ्यांच्या पिकांवर अक्षरशः करपण्याची वेळ आली आहे.