van dam overflow
sakal
संग्रामपूर - सद्यस्थितीत सातपुडा पर्वतामधील तिन जिल्ह्याच्या सीमा रेषेवर असलेले वारी हनुमान धरण 90 टक्के भरले आहे. या धरणात मध्य प्रदेश मधून पाण्याची आवक पाहता धरणाच्या दोन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
या पाण्यामुळे तालुक्यातील रिंगणवाडी गट ग्रामपंचायत हद्दीतील मोमिनाबाद गावाकडे जाण्या-येण्यासाठी असलेल्या वान नदीवरील पुलावरून सध्या पाणी वाहत असल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत.