

Yavatmal
esakal
वणी: तालुक्यातील बेसा येथे शनिवारी(ता. 30) दुपारी लागलेल्या भीषण आगीत गोठ्यात बांधून असलेल्या आठ बकर्यांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत बकरीपालक शेतकरी दत्तू गोहोकार यांचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.