Vidarbha Rain: विदर्भात पावसाला सुरवात, बळीराजा सुखावला; पिकांना जीवदान, शेतकऱ्यांना दिलासा, अनेक जिल्ह्यांत शेतीकामांना वेग

Rain Returns Across Vidarbha After Dry Spell: महाराष्ट्रातील मान्सून मुळे पेरणी, रोवणी आणि शेतीकामांना वेग आला असून विदर्भातील शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.
Vidarbha Rain

Vidarbha Rain

esakal

Updated on

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर मंगळवारी विदर्भभर पुनरागमन करत सर्वत्र समाधानकारक हजेरी लावली. बहुतांश जिल्ह्यांत संततधार किंवा रिमझिम पाऊस झाल्याने कोमेजलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोरदार पाऊस नसला तरी पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरत असून पेरणी, रोवणी आणि आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com