

Record-Breaking Heat: Wardha Becomes India’s Hottest City at 47.1°C
esakal
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून विदर्भासह संपूर्ण राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. यातच आता वर्धा शहर देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून नोंदवले गेले आहे. मध्यंतरी सलग दोन दिवस येथील तापमान ४६ ते ४६.५ अंश सेल्सिअसवर स्थिरावले होते. मात्र, बुधवारी तापमानाने नवीन उच्चांक गाठत ४७.१ अंश सेल्सिअसची नाेंद केली. या प्रचंड उन्हामुळे संपूर्ण वर्धेकरांच्या अंगाची लाहीलाही हाेत आहे.