

Vardha News
esakal
वर्धा: गांधी विचारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या वर्धा शहरात सध्या बेकायदा पोस्टरबाजीने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. शासकीय इमारती, दुभाजक, विद्युत खांब आणि सार्वजनिक भिंतींवर अनधिकृत जाहिराती मोठ्या प्रमाणावर चिकटवल्या जात असून, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.