गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

नागरिकांनी खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Warning of heavy rains in Gadchiroli district
Warning of heavy rains in Gadchiroli district

गडचिरोली - हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस संपूर्ण गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी या सूचनांमुळे घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी मीना यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी अतिमहत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे. जिल्हा प्रशासन पोलिस यंत्रणेसह सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. पुढील तीन दिवस शासकीय, निमशासकीय व अत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना बंद राहणार आहेत.

जिल्ह्यातील चपराळा येथे वर्धा व वैनगंगा नदीचे पाणी एकत्र येऊन प्राणहितामधून गोदावरी नदीला मिळते. तसेच मेडिगट्टा बॅरेजमधून आठ लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग ७५ दरवाजांमधून सुरू आहे. त्यामुळे नदीकाठी पडलेल्या पावसाचे पाणी सहज नदीत मिसळत नाही. त्यामुळे लहान-मोठे सर्व नाले मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. अशा ठिकाणी नागरिकांनी विनाकारण नाले ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. कोरची तालुक्यात एकाच दिवसात १८६ मिलिमीटर पाऊस झाला. अहेरी तालुक्यातही काल २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नागरिकांनी नदी, नाले व तलाव अशा ठिकाणी जाणे टाळावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com