

Washim News
esakal
रिसोड: वाशीम जिल्ह्यात हळद व कांदा बीज पिकाचा हंगाम सुरू होण्याआधीच अवकाळी पावसाने कहर केला आहे. सोमवारी (ता. ३०) रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे हळद, कांदा, आंबा, भाजीपाला यासह उन्हाळी पिकाचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. हवामान विभागाने ता. ३ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातही विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.