वर्धा शहरात आता चार दिवसाआड पाणीपुरवठा

File photo
File photo

वर्धा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पामध्ये झालेल्या पावसामुळे पाणीपातळी वाढल्याने वर्धा शहराला आता पाच दिवसांऐवजी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी दिली.
गतवर्षी अल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावली होती.
त्यामुळे वर्धेकरांना उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पातील जलसाठा तळाला गेला होता. त्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन नगरपालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये धामनदीचा गाळ उपसला, तसेच शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला. परंतु त्यानंतर पाण्याची टंचाई लक्षात घेता चार दिवसाआड व त्यानंतर पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले.
या सर्व समस्यांना सामोरे जात असताना जून महिन्याच्या शेवटी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदीपात्रात पूर्ववत पाणीसाठा जमा झाला. वर्तमानस्थिती लक्षात घेता नगरपालिकेद्वारे पाच दिवसाआड येणारे नळ आता सर्व प्रभागात चार दिवसाआड करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी दिली.
त्याचप्रमाणे उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, सर्वांनी पाण्याचा होणारा दुरुपयोग थांबवावा व पाण्याचा जपून वापर करावा, जेणेकरून भविष्यात शहरवासींना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com