Video : कोरोनाची भीती नाही साहेब... आम्ही भुकेनेच मरू

amravati
amravati

तिवसा (जि. अमरावती) : तिवसा शहरातील पंचवटी चौक येथे गेल्या पंचवीस वर्षापासून 25 आदिवासी कुटुंबे पाल टाकून राहत असून राज्यात लागलेल्या 21 दिवसाच्या संचारबंदीमुळे या सर्व कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला अन्नधान्याची मदत करावी, अशी मागणी या कुटुंबाकडून केली जात आहे.



कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली, यामुळे जीवनावश्‍यक वस्तुच्या दुकानाला वेळेचे बंधन ठेवून आवश्‍यक असलेली दुकाने चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे बाजारपेठेत सामान खरेदी करण्यासाठी नागरिक येतात मात्र ज्यांच्या घरची चूल रोजच्या मजुरीने पेटत असेल अशा लोकांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित होतो आहे, शहरातील पंचवटी चौकात गेल्या पंचवीस वर्षांपासून या कुटुंबांचे वास्तव्य आहे. हातावर व्यवसाय करणारी ही कुटुंब असून कुणी गॅस दुरुस्ती, स्टो दुरुस्ती, केसावर भांडी विकणे, टोपले विकणे, व देवाच्या नावावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र गेल्या 22 मार्चपासून राज्यात लागलेल्या संचारबंदीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, यातील अलका अंबोरे यांचे मोठे कुटुंब आहे. दोन मुलं व त्यांचे लहान मुले आहेत. केसावर भांडी विकून ते आपला उदरनिर्वाह करतात.

एकच झोपडीत राहून कसे तरी जीवन जगत आहेत. दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था नाही तर तोंडाला बांधायला मास्क, हात धुण्यासाठी हॅन्ड वॉश कुठून आणणार? आम्ही आरोग्याची काळजी करायची की दोन वेळ जेवण कसं मिळणार याचा विचार करायचा? असा प्रश्न या आदिवासी कुटुंबांकडून केला जातो आहे, तालुक्‍यातील खेड्यापाड्यात जाऊन हे आदिवासी लोक लहान व्यवसाय करून आपल्या मुलाबाळांसह राहतात. ही 25 कुटुंबे पाल टाकून उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या सर्व ऋतूंचा सामना करून कसे तरी आपले आयुष्य जगत आहेत, मात्र आता या कोरोना व्हायरसमुळे त्यांचे जगणे कठीण झाले असून घरात अन्नधान्य संपण्याच्या मार्गावर आहे, त्यानंतर आम्ही गोटे, माती खावी का? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे, एकूणच सर्व कुटुंबांची प्रशासनाला विनंती आहे. आम्हाला अन्नधान्य देऊन थोडी आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा या कुटुंबांकडून केले जात आहे.


दोनवेळच्या जेवणाचे वांधे
याठिकाणी आम्ही पंचवीस ते तीस कुटुंबे राहत असून पंचवीस वर्षापासून मिळेल ते काम व छोटे-मोठे व्यवसाय करून राहत आहे, मात्र आता या संचारबंदीमुळे आमच्या हाताला काम नसून दोन वेळ जेवणाचे वांदे झाले आहे, आम्ही घरातील महिला व पुरुष एकच वेळचं जेवण करतो व मुलाबाळांना दोन्ही वेळ जेवण देतो, मात्र आता घरातील अन्नधान्य संपले असून काय खायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,
- अलका अंबोरे,आदिवासी महिला.
 

परिस्थिती गंभीर
आमच्या पंचवटी कॉलनीत अनेक वर्षापासून ही आदिवासी कुटुंबे राहत आहेत. मिळेल ते गॅस, स्टो दुरुस्तीचे काम करून आपल्या मुलाबाळांसह माझ्या घरासमोरच पाल टाकून राहतात एक सामाजिक बांधिलकी म्हणून राजकीय क्षेत्रात काम करत असताना अशा लोकांना त्यांच्या गरजेनुसार मी अनेक वर्षांपासून अन्नधान्य व इतरही काही वस्तूची मदत करत असतो. मात्र संचारबंदी लागू झाल्यामुळे परिस्थिती खूप गंभीर असून शासनाने या आदिवासी कुटुंबाला अन्नधान्याची आणि आर्थिक मदत करावी.
- भूषण यावले, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com