Amravati News: सिंचन अनुशेषासाठी पश्चिम विदर्भाला केवळ अडीच हजार कोटी; आवश्यकता ३९ हजार कोटींची, तब्बल साडेतीन लाख हेक्टरचा अनुशेष

Vidarbha Irrigation:पश्चिम विदर्भात ३.५७ लाख हेक्टर जमीन अजूनही सिंचनाबाहेर असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे सिंचनाचा अभाव हे एक प्रमुख कारण ठरते. आवश्यक ३५ हजार कोटींपैकी राज्याने केवळ २,५९० कोटींची तरतूद केली आहे.
Amravati News
Amravati Newssakal
Updated on

अमरावती : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येस असलेल्या प्रमुख कारणांपैकी सिंचनाचा अभाव हे एक कारण आहे. या भागात जून २०२४ अखेर सिंचनाचा ३ लाख ५७ हजार ७११ हेक्टरचा अनुशेष शिल्लक असून, त्यासाठी निधीची बोंब आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी ३५ हजार ७२० कोटी रुपयांची गरज असताना राज्य सरकारने केवळ २ हजार ५९० कोटींची तरतूद केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com