काय? अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 263 किमीचे रस्ते खराब

file photo
file photo

नागपूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 263 किमीचे रस्ते खराब झाले असून, यासाठी 60 कोटींचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामविकास खात्याला पाठविला आहे. मोठ्या-मोठ्या पुलांचेही नुकसान झाल्याचे प्रस्ताव नमूद केले आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. 26 जुलैपासून ते 14 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली. यामुळे 263 किमीचे 138 रस्त्यांची दुरवस्था झाली. सर्वाधिक नुकसान कुही तालुक्‍यात झाले. येथील 55 किमीचे रस्ते खराब आहे. दुसरा क्रमांक हा हिंगणा तालुक्‍याचा लागत असून, 44 किमीचे रस्ते खराब आहेत. त्यामुळे वाहनधारकांना प्रवासात आडकाठी निर्माण होत आहे. या सर्वांची दुरुस्ती करायची झाल्यास 60 कोटी नऊ लाखांच्या निधींची गरज आहे. कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी 55 कोटी 37 लाखांची आवश्‍यकता आहे. तात्पुरत्या दुरुस्तीसाठी चार कोटी 72 लाखांची गरज असल्याचे बांधकाम विभागाने प्रस्तावात नमूद केले आहे. हा प्रस्ताव 26 ऑगस्टला ग्रामविकास खात्याकडे पाठविला आहे. नरखेड व सावनेर तालुक्‍यात एकही रस्ता पावसामुळे खराब झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com