

यवतमाळ: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यात दहा हजार रस्ते बांधकामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी या योजनेचा आढावा शुक्रवारी (ता. २७) घेतला.