

Yavatmal
esakal
यवतमाळ: आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांसाठी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता सहकार विभागाकडून योजनेच्या अटी, शर्थी आणि पात्रतेचे निकष जाहीर करणारे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर लाभार्थी शेतकर्यांची अंतिम यादी निश्चित होणार आहे.