संतोष देशमुख अपहरण आणि निर्घुण हत्या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याने सुरुवातीला स्वतःहून लातूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार तो आतापर्यंत लातूर कारागृहातच होता. विशेष म्हणजे, या प्रकरणातील इतर आरोपींनीही लातूर कारागृहाचीच मागणी केल्याने त्यावेळी कारागृहातील ‘सुखसुविधां’वर गंभीर आरोप झाले होते. दरम्यान, जिल्हा कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची बदली झाल्यानंतर परिस्थिती बदलल्याचं चित्र आहे. आता विष्णू चाटे याला लातूरऐवजी बीड कारागृहात हलवण्यात यावं, अशी इच्छा व्यक्त होत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अचानक बदललेल्या या भूमिकेमागे नेमकं कारण काय, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या मागणीमागे केवळ कारागृह बदलाचा विषय नसून, यामागे मोठं ‘इंगित’ आणि गौडबंगाल असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आरोपीची बदललेली भूमिका, कारागृह प्रशासनातील बदल आणि यामुळे उभे राहिलेले संशय, यामुळे हे संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. नेमकं काय घडतंय, याचा उलगडा तपासातूनच होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.