
परभणी शहरानजीक शेती असलेल्या ढगे कुटुंबाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देत त्यात सातत्य ठेवले. अलीकडील वर्षांत रेशीम शेती सुरू करून शेतीतील अर्थकारणाचा पाया अजून भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. रासायनिक खतांचा वापर काही वर्षांपासून बंद करून सेंद्रिय शेतीही आकारास आणली आहे.
परभणी शहरानजीक शेती असलेल्या ढगे कुटुंबाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देत त्यात सातत्य ठेवले. अलीकडील वर्षांत रेशीम शेती सुरू करून शेतीतील अर्थकारणाचा पाया अजून भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. रासायनिक खतांचा वापर काही वर्षांपासून बंद करून सेंद्रिय शेतीही आकारास आणली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परभणी शहरापासून काहीच किलोमीटरवर गणेशराव विठोबाराव ढगे यांची शेती आहे. मूळ पिंपळगांव ढगे (ता. परभणी ) या गावी त्यांची सात एकर वडिलोपार्जित जमीन होती. कुटुंब विभक्त झाल्यानंतर वाट्याला आलेली गावाकडची जमीन विकून परभणी शिवारात गणेशरावांनी पाच एकर जमीन घेतली. शेतीसोबत दुग्धव्यवसाय सुरू करून चिकाटीने त्यात सातत्य ठेवले. उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने शेती खरेदी केली. सध्या कुटुंबाकडे ३० एकर शेती आहे. खोल काळी माती आहे. विहीर आणि बोअरव्दारे हंगामी सिंचनाची सुविधा आहे. सर्व क्षेत्र ठिबकखाली आहे. हंगामनिहाय सोयाबीन, मूग, कापूस, गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके ते घेतात.
दुग्धव्यवसायातून शेतीचा विस्तार
कुशल मजूर व्यवस्थापन
घरच्यांची मदत
शेतीतही प्रयोग
गेल्यावर्षी ऐन काढणीवेळी पावसात भिजल्यामुळे चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे उपलब्ध होऊ शकले नाही. मग वरपुड येथील प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत देशमुख- वरपुडकर यांचे मार्गदर्शन घेतले. त्यातून उन्हाळी हंगामात पाऊण एकरांत एमएयूएस ६१२ वाणाचे साडेतीन क्विंटल बियाणे उपलब्ध केले. घरचे आणि वरपुडकर यांच्याकडून बियाणे विकत घेऊन १६ एकरांत पेरलेल्या बियाण्याची उगवण चांगली झाली.
रासायनिक निविष्ठांचा वापर बंद
रेशीम शेतीचा तिसरा पर्याय
शेती, दुग्धव्यवसाय यांना रेशीम शेतीचा तिसरा आर्थिक पर्याय ढगे कुटुंबाने उपलब्ध केला आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय पी. एस. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुती लागवड तसेच रेशीम कीटक गृहाची उभारणी केली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रत्येकी सात दिवसांचे रेशीम शेती प्रशिक्षण ढगे यांनी घेतले आहे. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन त्यात आणणे शक्य झाले.
अशी आहे रेशीम शेती
लॉकडाऊनचा फटका
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी एकेवेळी किलोला ४४० रुपये दर मिळून २४ हजार रुपये प्रति बॅच उत्पादन मिळाले होते. सध्या लॉकडाऊनमध्ये दोनशे अंडीपुंजांपासून एक क्विंटल माल मिळाला. मात्र सध्या दर अत्यंत कमी म्हणजे किलोला १२५ रुपये सुरू आहे. राज्य तसेच राज्याबाहेर कोष विक्रीस नेण्यासाठी मर्यादा येत आहेत. डॉ. लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मित्र नरेश शिंदे यांच्याकडील सोलर ड्रायरमध्ये कोष वाळवून त्यांची साठवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे काम वेळखाऊ असल्याचे ढगे सांगतात. नाइलाजाने आहे त्या दरांत विक्री करण्याची वेळ आली आहे.
- गणेशराव ढगे- ९६७३१११०४८
Edited By - Prashant Patil