Ahilyanagar News : शेतकऱ्यांचा एल्गार! जमीन परत द्या; अन्यथा आंदोलन तीव्र करू, श्रीरामपूरमध्ये ८० ते ९० शेतकरी स्थानबद्ध

जमिनी परत मिळाल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचे काम न करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी जेसीबी मशीन रोखून धरली. आंदोलन चिघळू लागल्याने पोलिसांनी या शेतकऱ्यांना ताब्यात घेत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात हलवित त्यांना स्थानबद्ध केले.
Farmers detained in Shrirampur during protest demanding return of their land; agitation continues to escalate.
Farmers detained in Shrirampur during protest demanding return of their land; agitation continues to escalate.Sakal
Updated on

श्रीरामपूर : शेती महामंडळाच्या जमिनीत बाभळी काढण्याच्या कामास आकारी पडीत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, नऊ गावांतील शेतकऱ्यांनी आज (ता.१२) सकाळपासून महामंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. जमिनी परत मिळाल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचे काम न करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी जेसीबी मशीन रोखून धरली. आंदोलन चिघळू लागल्याने पोलिसांनी या शेतकऱ्यांना ताब्यात घेत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात हलवित त्यांना स्थानबद्ध केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com