अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे पालन करीत जिल्हा परिषदेत 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
श्रीगोंद्यातील कारखान्यांचे 16 लाख टन ऊस गाळप; नागवडे, कुकडी कारखान्यांना कमी क्षमतेच्या 'साजन शुगर'ची टक्कर
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक केल्या आहेत. तसा अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशामुळेच जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. 15) केली जाणार आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत 31 मार्चपर्यंत कामकाज सुरू राहणार आहे.
दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हा परिषदेतील कामकाज 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तीन कर्मचारी आढळले बाधित
लोकसेवा आयोगाची परीक्षा 21 मार्चला होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परीक्षेअगोदर परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत जिल्हा परिषदेतील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.