
अहिल्यानगर : बदलते हवामान, अचानक येणारी आपत्ती आदींमुळे पीकविम्याचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले आहे. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी साडेपाच लाख अर्ज दाखल करून पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. केवळ एक रुपयांत ही विमा योजना आहे. यापूर्वी मिळालेल्या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांचा सहभाग वाढल्याचे दिसून येत आहे.