
श्रीगोंदे : संत शेख महंमद महाराज हे कोणत्या एका समाजाचे नसून ते संपूर्ण भारतीयांचे आहेत. त्यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम थांबवणे उचित नाही. हे काम लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, अशी भूमिका ज्येष्ठ समाजप्रबोधनकार बंडतात्या कराडकर यांनी मांडली.